रत्नागिरीजवळ खासगी बसला अपघात, चार ठार

मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ लक्झरी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.

Updated: Sep 21, 2014, 12:59 PM IST
रत्नागिरीजवळ खासगी बसला अपघात, चार ठार title=

रत्नागिरी: मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ लक्झरी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.

जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

शनिवारी रात्री मुंबईतील परळ इथून खासगी लक्झरी बस लांजाच्या दिशेनं रवाना झाली. आज पहाटे पाचच्या सुमारास रत्नागिरीजवळील आसुर्डे इथं बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस झाडावर जाऊन आदळली. 

या अपघातात मुंबईतील एक तर लांजा आणि राजापूर इथल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. यात आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही. तर या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, दाट धुक्यामुळं हा अपघात झाल्याचं समजतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.