ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.

Updated: Oct 27, 2015, 11:47 AM IST
ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार title=

पुणे: पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.

आकाश अशोक पवार असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो धनकवडीच्या बालाजीनगरमध्ये राहत होता. पोलिसांच्या तपासात आकाशला मारून त्याची राख नदीत टाकल्याचं पुढे आलंय. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सागर घारमाही या २६ वर्षीय तरुणाला अटक केलीय. आणखी तीन आरोपींचा शोध सहकारनगर पोलीस करत आहेत. 

आणखी वाचा - पुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी आकाश आणि आरोपींमध्ये भांडण झालं होतं. आकाश आरोपी सागर आणि त्याच्या तीन मित्रांपैकी कुणाची हत्या करण्याचा कट आखतोय, असं आरोपींना कळलं. त्यामुळं त्यांनी आकाशचंच अपहरण करून त्याची हत्या केली. 

शनिवारी त्यांनी आकाशची एका बंद खोलीत हत्या केली आणि मृतदेह कारमधून सारोळा इथं आणला. तिथं त्यांनी मृतदेह जाळला आणि राख नदीत सोडली. आकाश बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर तपासात ही घटना उघडकीस आली. 

अटक करण्यात आलेल्या सागरनं सर्व खुलासा केला. सागर घारमाही हा ड्रायव्हर आहे आणि त्याचे तिनही साथीदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे आहेत. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. 

आणखी वाचा - तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहा पुण्यात काय घडलं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.