fdi retail

आप सरकारचा एफडीआयला विरोध, मल्टिब्रँड रिटेलचा एफडीआय रद्द

दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारनं मल्टिब्रॅन्ड रिटेल म्हणजेच किराणा व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी घेतलेले निर्णय दिल्लीत सत्ता स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांतच रद्द केले.

Jan 14, 2014, 10:38 AM IST

राज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर

लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याचं सपानं स्पष्ट केलंय. यामुळे एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार पास होणार हे नक्की झालंय.

Dec 7, 2012, 01:13 PM IST

माया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!

रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.

Dec 5, 2012, 07:13 PM IST

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.

Dec 5, 2012, 07:09 PM IST

एफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप

एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली

Dec 4, 2012, 08:22 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.

Sep 24, 2012, 07:23 PM IST

ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

Sep 18, 2012, 08:49 PM IST

विदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता

सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.

Sep 14, 2012, 06:37 PM IST

पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी

भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मिळावा, या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

Aug 2, 2012, 08:34 AM IST