जेठालाल आणि टप्पूमध्ये भर सेटवर असं काय घडलं? की दोघांमध्ये आजही अबोला

 इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. 

Updated: Mar 4, 2022, 02:05 PM IST
 जेठालाल आणि टप्पूमध्ये भर सेटवर असं काय घडलं? की दोघांमध्ये आजही अबोला title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून अद्याप प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले. या टीव्ही सीरियलमध्ये दिलीप जोशीपासून ते बापूजी आणि बबिता अशी एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखांचा समावेश आहे.

या टीव्ही सीरियलशी संबंधित एका वादाबद्दल सध्या खूपच चर्चा होत आहे, जी एकेकाळी खूप चर्चेत होती. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की सीरियलमध्ये मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि 'टप्पू' अर्थात अभिनेता राज अनादकत यांच्यात वाद झाला आहे.

सेटवर उशीर झाल्याबद्दल दिलीपने राजला फटकारले असल्याची बातमी समोर आली होती. दिलीप या मालिकेतील सर्वात ज्येष्ठ अभिनेते आहेत पण ते वेळेवर शूटिंगसाठी सेटवर येतात. मात्र, टप्पू अर्थात राज अनेकदा सेटवर उशिरा पोहोचतो, हे सतत घडू लागलं होतं. मग एके दिवशी हिच गोष्ट पुन्हा घडली. राज सेटवर उशीरा पोहोचला.

त्यामुळे दिलीप जोशी यांना तासभर वाट पाहावी लागली. त्यामुळे संतापलेल्या दिलीप यांनी राज अनादकतला खडसावून वेळेवर येण्याची सूचना केल्याचे बोललं जात आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Did You Know? Jethalal Is Abusive Towards  Champaklal & Tapu As Per Original Literature

त्यासोबत  राज अनादकत अजूनही दिलीप जोशींना इन्स्टाग्रामवर फॉलो करत असताना, दिलीप जोशी यांनी त्याला अनफॉलो केले आहे. असं बोललं जात आहे.

मात्र, प्रसारमाध्यमांनी दिलीप जोशी यांच्याकडून या घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अभिनेत्याने सेटवर असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.