या अभिनेत्रीला व्हायचं नाही 'आई' जाणून घ्या नेमकं कारण

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे

Updated: Apr 9, 2022, 07:55 PM IST
या अभिनेत्रीला व्हायचं नाही 'आई' जाणून घ्या नेमकं कारण title=

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री पारुल चौहान सध्या 'धर्म योद्धा गरूड' या टीव्ही मालिकेमुळे चर्चेत आली आहे. टीव्ही दुनियेत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  पारुलला आई व्हायचं नाहीये. तिच्या या वक्तव्यामुळे चाहते आणि तिचे मित्र नाराज झाले आहेत. वैवाहिक जीवनात सगळंकाही ठीक असूनही पारुलला मूल होऊ  द्यायचं नाही. अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. सर्वांना जाणून घ्यायचं आहे की, पारुलने हा निर्णय घेण्यामागचं कारण काय?

व्यावसायिक जीवनात एकापाठोपाठ एक यशाच्या शिडी चढल्यानंतर पारुल चौहानने २०१८ मध्ये अभिनेता चिराग ठक्करसोबत लग्न केलं. चिराग अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसला आहे. चिराग आणि पारुल हे टीव्ही इंडस्ट्रीतील आवडतं कपल आहेत. आता या  कपलला लवकरच आई-वडिलांच्या भूमिकेत पाहण्याची चाहत्यांची इच्छा असली तरी अपूर्णच राहील, असं चाहत्यांना वाटतं. कारण पारुलला कधीही मूल नको आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पारुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, लग्नानंतर माझं आयुष्य बदललं आहे. मी आता परिपक्व आणि जबाबदार बनले आहे. माझे पती आणि सासरची माणसं खूप छान आहेत. मी माझे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. पण मला मुलं होऊ द्यायचं नाही. मी याबद्दल मी ओपन आहे. माझा पती देखील माझ्या निर्णयाचा आदर करतो. मला मुलं आवडतात पण माझ्यावर इतर कोणाकडूनही मुल होण्याचं दडपण नाही. सासरच्या मंडळींनीही साथ दिली. मी जशी आहे तशीच आहे.