'Taarak Mehta...'अय्यरने उगारला बबीतावर हात; दोघांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय

वाचा  काय आहे प्रकरण? 

Updated: Jul 12, 2021, 08:01 AM IST
'Taarak Mehta...'अय्यरने उगारला बबीतावर हात; दोघांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. कधी टप्पू सेनेचा खोडकरपणा तर कधी गोकूळधाम सोसायटीमधील एकीमुळे ही मालिका चर्चेत असते. प्रेक्षकांचं सर्वात जास्त लक्ष असतं ते म्हणजे गोकूळधामच्या महिला मंडळाकडे. सांगायचं झालं तर या मालिकेचे जुने एपिसोड देखील लोक तितक्याचं आवडीने पाहातात.

आज आम्ही तुम्हाला मालिकेतील एक एपिसोड दाखवणार आहोत, ज्यामध्ये सोसायटीमधील हॉट आणि बोल्ड महिला बबीताने लवकरचं अय्यरसोबत  विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  या एपिसोडमध्ये तुम्ही अय्यर आणि  बबीता यांना भांडताना पाहू शकता. बबीता सांगते की अय्यरने तिच्यावर हात उचलला आहे.  हे ऐकून जेठालालला धक्का बसतो आणि जेठालालचा  राग अनावर होतो. 

जेव्हा ही गोष्ट संपूर्ण सोसायटीला माहिती होते, तेव्हा प्रत्येकाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर बबीता आणि अय्यर यांच्यामधील भांडणं चव्हाट्यावर येतात. दोघे एकमेकांना म्हणतात आता एकत्र नाही राहायचं आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.  सोसायटीच्या प्रत्येकाने समजावून देखील दोघेही ऐकायला तयार नाहीत. काही वेळाने हा वाद टोकावर पोहोचतो. तेव्हा बबीता सांगते की आम्ही हे सर्व तुम्हाला एप्रिल फूल बनविण्यासाठी केलं आहे.