...म्हणून पळून जाऊन सोहेलनं केलं लग्न

अखेर सोहेलचा जावई म्हणून केला स्वीकार.

Updated: Dec 20, 2019, 04:22 PM IST
...म्हणून पळून जाऊन सोहेलनं केलं लग्न title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये खान भावंडांची चर्चा वाऱ्यासारखी पसरत असते. अरबाज, सलमान आणि सोहेल खान या भावंडांच्या त्रिकूटा विषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता इच्छूक असतो. सिनेविश्वात अरबाजने आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस त्याचा प्रयत्न फेल ठरला. पण त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र बाकी दोन भावंडांपेक्षा अधिक चांगलं आहे. कोणत्याच क्षेत्रात त्याला यश मिळालं नसलं तरी त्याची लव्हस्टोरी मात्र हिट झाली. 

एखाद्या फिल्मी कथेपेक्षा त्याची लव्हस्टोरी फार सरस आहे. त्याच्या लव्हस्टोरी समोर ९०च्या दशकातील चित्रपटाही फिका ठरेल. सोहेलची पत्नी मुळची दिल्लीची आहे. ती फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी स्वप्नांच्या नगरीत आली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Family slandHome #AmillaFushi #seemakhan76

 

हिच ती वेळ जेव्हा सोहेल अणि सीमाची ओळख झाली आणि पहिल्याच नजरेत तो सीमा खानच्या प्रेमात पडला. पण त्यांच्या नात्याला सीमाच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा बिलकूल नव्हता. 

दोघांनी घरच्यांना समजवण्याचा अथक प्रयत्न करा. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोहेलनं मंदिरात सीमासोबत लग्न केलं. 

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील सीमाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली नव्हती. परंतु आता तिच्या घरच्यांनी सोहलचा जावई म्हणून स्वीकार केला आहे. सोहेल आणि सीमाला दोन मुलं आहेत.