सलमानची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली, ट्विट करत मागितली माफी

अभिनेता सलमान खानने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

Updated: Apr 30, 2020, 07:07 PM IST
सलमानची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली, ट्विट करत मागितली माफी title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच ऋषी कपूर यांची माफी मागितली आहे. सलमानने म्हटलं की, चिंटू सर, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. सलमान खान आणि ऋषी कपूर यांनी डेव्हिड धवनच्या 'ये है जलवा' (२००२) चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अमिषा पटेलसुद्धा मुख्य भूमिकेत होती.

ऋषी कपूर आणि सलमान खान यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर हे सलमानच्या वागण्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. रिपोर्ट्सनुसार 2018 मध्ये सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये ऋषी कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांच्यात काही वाद झाला. ऋषी कपूर यांनी सीमा खानकडे सलमानच्या वागण्या विषयी तक्रार केली होती. सलमान त्याच्याशी कधी नीट भेटत नाही अशी तक्रार ऋषी कपूर यांनी सीमा खानकडे केली होती. त्यानंतर त्यांच्यात काही वाद झाला. यानंतर ऋषी कपूर तेथून निघून गेले होते. ही गोष्ट जेव्हा सीमा खानने सलमानला सांगितली तेव्हा सलमान देखील रागावला होता.

ऋषी कपूर यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी म्हटले की, 'आपले जवळचे ऋषी कपूर यांचे आज सकाळी 8.45 वाजता निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते leukemia मुळे आजारी होते. रुग्णालयात, डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांपासून ते स्वत: ला मजबूत ठेवत होते. ते बिनधास्त जगण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या सर्वांना माहित आहे की, त्यांची इच्छा होती की अश्रृंनी नाही तर हसत त्यांना निरोप द्यावा.'

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x