गुलमर्गमध्ये रोप वेची केबल तुटून 7 जणांचा मृत्यू

गुलमर्गमध्ये रोप वे केबल तुटून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही दुर्घटना घडलीय. मृतांमध्ये चार पर्यटकांचा समावेश असून ते दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. 

Updated: Jun 26, 2017, 03:48 PM IST
गुलमर्गमध्ये रोप वेची केबल तुटून 7 जणांचा मृत्यू title=

गुलमर्ग : गुलमर्गमध्ये रोप वे केबल तुटून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झालाय. जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही दुर्घटना घडलीय. मृतांमध्ये चार पर्यटकांचा समावेश असून ते दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. 

जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी अनाघा आणि जान्हवी अशी त्यांची नावं आहेत. त्यांचा गाइड मुख्यात अहमद गनीचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अंद्रासकर कुटुंबीय हे मूळचे नागपूरचे राहणारे आहेत. 

इतर मृतांची ओळख अद्याप पटवण्यात आली नाही. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय.