Oil Spill in the Sea: समुद्रात तेल गळती झाली तर किती घातक ठरु शकते? भारताला मोठा धोका

समुद्रात तेल गळती किती घातक असू शकते याची अचूक कल्पना जगाने पाहिली. 

Updated: Apr 20, 2022, 07:45 PM IST
Oil Spill in the Sea: समुद्रात तेल गळती झाली तर किती घातक ठरु शकते? भारताला मोठा धोका title=

Oil Spill in the Sea : 1991 च्या आखाती युद्धात समुद्रात तेल गळती किती घातक असू शकते याची अचूक कल्पना जगाने पाहिली. कथितरित्या, सद्दाम हुसेनच्या सैन्याने कुवेतहून परतताना तेथील तेल विहिरीतील तेल समुद्रात टाकले. त्याचा परिणाम विनाशकारी होता, कच्च्या तेलाचा जाड थर १६० किमी लांब आणि ६८ किमी रुंद परिसरात पसरला होता. या थराची जाडी 13 सेमी पर्यंत होती.

गळतीचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक महिने लागले

या विनाशकारी गळतीचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक महिने लागले, त्यावेळेस हजारो समुद्री पक्षी, कोर रीफ, मीठ मैदाने नष्ट झाली. तेल किनाऱ्यावर पोहोचले. सौदी अरेबियाला पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागला, किनारी भागात झाडे नष्ट झाली, मच्छिमारांना उपजीविकेच्या संकटाचा सामना करावा लागला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी याला वेडेपणाचे कृत्य म्हटले होते. पण हे भयंकर अस्त्र भारताविरुद्ध देखील वापरले जावू शकते. जगातील 90 टक्के कच्चे तेल भारतीय समुद्रातून जाते आणि अशा वेड्या कृतीचा धोका केव्हाही समोर येऊ शकतो.

तेलगळतीला तोंड देण्याची तयारी हाच बचाव

तेलाचा पुरवठा करून रात्रंदिवस धावणारे टँकर बंद करता येत नाहीत. म्हणजेच तेलगळतीला तोंड देण्याची तयारी हाच एकमेव बचाव आहे. या कामासाठी भारतीय तटरक्षक दल सदैव तत्पर असते. तेल गळतीच्या अपघातात तटरक्षक दल मुख्यत्वे जबाबदार आहे, परंतु नौदल, हवाई दलासह इतर सर्व सेवा देखील सदैव तत्पर असतात.