पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Updated: May 6, 2018, 08:21 PM IST

मुंबई : पुणे नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मूत्यु  झाला आहे. 

कोणाचा झाला मृत्यू ? 

दशरथ रघु पांडे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली आहे. 

चार दिवसात तीन ठार चार जखमी 

सतत सुरू असलेल्या अपघाताच्या सत्राने स्थानिक ग्रामस्थ संतपाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी या महामार्गावरील वाहतूक रोखून ठेवली आहे. महामार्ग प्रशासनाचे जबाबदार अधिकारी जागेवर येत नाही तो पर्यंत रास्ता रोखो करण्याचा पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. 

वाहतूक कोंडी  

पुणे नाशिक महामार्ग हा गजबजीचा असतो. आज रविवार आणि सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकजण प्रवासासाठी बाहेर पडलेले असतात. त्यामुळे या महामार्गावर आज वाहनाच्या 4 किलोमीटर लांब रांगा लागल्याचं दृश्य आहे.