येलूरमध्ये शेतात विजेची तार तुटल्याने तिघांचा मृत्यू

शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्‍पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. 

Updated: Mar 31, 2018, 12:44 PM IST
येलूरमध्ये शेतात विजेची तार तुटल्याने तिघांचा मृत्यू  title=

सांगली : विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. सांगलीतील येलूरमध्ये घडलेल्या घटनेत या तिघांमध्ये मायलेकरांचा समावेश आहे. शेतातील विजेच्या तारांना स्पर्श होऊन शॉक लागल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. तारांच्या संपर्कात ५ जण आले. ज्यातील तिघे जागीच ठार झाले तर दोघं सुदैवाने बचावले आहेत. प्रभाकर लक्ष्‍मण महाडिक (वय - ३५), छाया लक्ष्‍मण महाडिक (वय - ५५)  प्रकाश भिमण्‍णा मगदूम (वय- ५१) असे तिघांची नावे आहेत.  पहाटेच्या सुमारास घडली घटना. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्‍पर्श झाल्याने ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x