'एनडीएचा विजय आपल्याला मान्य नाही, भाजपाचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता'

एनडीएचा विजय आपल्याला मान्य नाही, एनडीए काठावरच आहे, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता

Updated: Nov 11, 2020, 06:53 PM IST
'एनडीएचा विजय आपल्याला मान्य नाही, भाजपाचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता' title=

औरंगाबाद : एनडीएचा विजय आपल्याला मान्य नाही, एनडीए काठावरच आहे, तसेच बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप बहुचन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत, निवडणूक आयोगावरही टीका केली आहे तसेच भाजपावर देखील गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे, बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी भाजपाचा दंगली घडवण्याचा डाव होता, पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होवू दिला नाही. 

तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला काठावर बहुमत असल्याने आपण त्याला विजय मानतच नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी निक्षून सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना ईव्हीएममशीनवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

बिहारमध्ये पप्पू यादव यांनी स्थानिकांना मोठी मदत केली. पप्पू यादव यांच्यासाठी मी स्वत: सभा घेतल्या, प्रत्येक सभेला जवळपास १० हजार लोक जमत होते. तरी देखील हा उमेदवार चौथ्या नंबरवर कसा राहिला? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम करत असल्याची टीका प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.