राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Updated: Nov 24, 2016, 05:45 PM IST
राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं सर्वदूर सुट्टे पैशांची अडचण झाली आहे. या निर्णयाला पंधरा दिवस झाले असले तरी देखील याची तीव्रता कमी झालेली नाही. त्यामुळं राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफीची मुदत आणखी आठ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

महामार्गांवरच्या टोलबंदीची मुदत आज मध्यरात्री संपणार होती. त्याआधी 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं आता राज्य सरकारही राज्यातल्या अखत्यारीतल्या मार्गांवर टोलमाफीची मुदत वाढवण्याची शक्यता आहे.