निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली

नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे. 

Updated: Nov 28, 2016, 05:37 PM IST
निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली title=

मुंबई : नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर आगपाखड केली आहे. जिल्ह्यात सतत भाजपला मदत करणं आणि काँग्रेसच्या विरोधात मदत करणं हेच काम असल्याची घणाघाती टीका थोरातांनी विखे पाटलांवर केली आहे, तर थोरांतानीच पक्षनिष्ठा तपासण्याची गरज असल्याचं प्रत्युत्तर विखे पाटलांनी दिलं आहे.

तर नारायण राणेंनीही काँग्रेस नेतृत्वावर प्रहार केला आहे. घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही अशी टीका राणेंनी पक्षनेत्यांचं नाव न घेता केली आहे.