स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करा-अनासपुरे

कर्ज माफी हा अंशतः उपचार आहे, मात्र खरं पाहायला गेलं तर शेतक-यांना न्याय मिळवून द्यायची गरज आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 4, 2017, 07:21 PM IST
 स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करा-अनासपुरे title=

पुणे : कर्ज माफी हा अंशतः उपचार आहे, मात्र खरं पाहायला गेलं तर शेतक-यांना न्याय मिळवून द्यायची गरज आहे, असं  सांगत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करायलाच पाहिजे, असं मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी मांडलयं.. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

जय जवान जय किसान या अभियानार्तगत 2016- 2017 वर्षात शहीद  जवानांच्या कुटुंबीयांना देखील नाम फाऊंडेशन आता मदत करणार असल्याची माहिती मकरंद अनासपुरे यांनी यावेळी दिली... सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरीच आज उपाशी असल्याची खंत  व्यक्त करत शेतक-याचा फुटबॉल करु नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं.