२६/११ पिडीतांवर सरकारचा अन्याय

मुंबईवरच्या २६/११ च्या हल्यात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि हल्ल्यातल्या पीडितांनी आज मदतीऐवजी पोलिसांनी ताब्यात घेतलं. विविध मागण्यांसाठी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही.

Updated: Nov 26, 2011, 12:29 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबईवरच्या २६/११ च्या हल्यात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि हल्ल्यातल्या पीडितांनी आज मदतीऐवजी पोलिसांनी ताब्यात घेतलं. विविध मागण्यांसाठी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळं भाजप कार्यालयापासून ते मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या बेतात होते. त्याचवेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मदत न करता त्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केलीय. या प्रकरणी किरीट सोमय्यांना अटकही करण्यात आली.

Tags: