'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी'

सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.

Updated: Aug 9, 2014, 11:07 PM IST
'गोविंदा : सानपाडाची घटना दुर्दैवी, मुलांना बंदी हवी' title=

नवी मुंबई : सानपाडा इथली घटना दुर्दैवी असल्याचं मत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी व्यक्त केलंय. तर मुलांना बंदी करण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केलेय.

ही दुर्घटना दुर्दैवी असून दहीहंडी उत्सवात वयाची मर्यादा असावी अशी अपेक्षा सचिन अहीर व्यक्त केली. मात्र कोर्टानी आणि सरकारने हस्तक्षेप करण्याऐवजी समन्वय समितीने याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं
खासदार पूनम महाजन यांनी दहीहंडीमध्ये लहान मुलांना खेळवण्यावर बंदीची मागणी केलीय. या मागणीचं पत्रच त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांना लिहीलंय. 

गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

सानपाडा परिसरात काल रात्री हा गोविंदा पडला. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किरण तळेकर असं या गोविंदाचं नाव असून तो १४ वर्षांचा होता. काल रात्री सानपाडा परिसरात दहीहंडीचा सराव सुरू होता. त्यावेळी अचानक थर सरकले आणि पाचव्या थरावरून किरण खाली कोसळला. 

त्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्याला तातडीनं नेरूळ इथल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथं अपुऱ्या सुविधेमुळं त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. तिथून त्याला वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळपर्यंत त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी त्यानं उपचारांना प्रतिसाद देणं थांबविले आणि त्याचा मृत्यू झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.