'त्यासाठी याचिका दाखल करा'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. शेवटचा सामना जिंकत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला. पण सिडनीमध्ये झालेली ही मॅच कदाचित कॅप्टन धोनीची शेवटची असेल असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला. 

Updated: Jan 24, 2016, 12:13 AM IST
'त्यासाठी याचिका दाखल करा' title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. शेवटचा सामना जिंकत टीम इंडियानं लाज राखायचा प्रयत्न केला. पण सिडनीमध्ये झालेली ही मॅच कदाचित कॅप्टन धोनीची शेवटची असेल असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला. 
सिडनीमध्ये झालेल्या या मॅचनंतर धोनीला पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला की तुझी ही शेवटची मॅच होती का ? तेव्हा कॅप्टन कूलनं आपल्या नेहमीच्याच कूल अंदाजामध्ये पत्रकारांना उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर जनहित याचिका दाखल करा, असं टोला धोनीनं लगावला.