भारताने जिंकला अंध टी-२० आशिया चषक

अंध टी-२० एशिया चषक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४४ धावांनी धूळ चारत जेतेपदावर नाव कोरले. 

Updated: Jan 25, 2016, 09:06 AM IST
भारताने जिंकला अंध टी-२० आशिया चषक  title=

कोची : अंध टी-२० एशिया चषक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४४ धावांनी धूळ चारत जेतेपदावर नाव कोरले. 

भारताच्या अंध क्रिकेपटूंनी अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करताना एशिया चषक उंचावलाय. कोचीमध्ये हा सामना रंगला होता. 

अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०८ धावा केल्या होत्या. विजयासाठी २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या १६४ धावांवर संपुष्टात आला.