Rohit Sharma: ...म्हणून 9 गोलंदाजांचा वापर केला; अखेर सामन्यानंतर रोहित शर्माने खरं सांगितलंच!

Rohit Sharma: नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात टीमने इंडियने 160 रन्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या 11 खेळाडूंपैकी तब्बल 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली.

| Nov 13, 2023, 10:47 AM IST
1/6

यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाचा सलग 9 वा विजय होता.  या सामन्यात भारतीय संघाने 9 गोलंदाज वापरले. पण नवव्या सामन्यात भारताने 9 गोलंदाज का वापरले, याचं खरं कारण आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिलंय.

2/6

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराम, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही गोलंदाजी केली. हे भारताचे पाच गोलंदाज ठरलेले होते.

3/6

मात्र याशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनीही गोलंदाजी केल्याचं दिसून आलं.   

4/6

याबाबत रोहित म्हणाला की, आम्ही नेदरलँड्सच्या सामन्यात 9 गोलंदाज वापरले. या सामन्यात आम्हाला तशी संधी मिळाली. त्यामुळे आम्ही हा प्रयोग करू शकलो.   

5/6

गोलंदाजीचे विविध पर्याय असाायला हवेत, अशी आमची धारणा आहे. या सामन्यात आम्ही ९ गोलंदाज वापरले आणि ती गोष्ट आम्ही करू शकलो आहे, असंही रोहित म्हणाला.

6/6

आमच्याकडे गोलंदाजीचे किती पर्याय आहेत, हे आता समोर आलंय. या गोष्टीचा नक्कीच फायदा आम्हाला होणार आहे. याशिवाय भारताकडे फक्त पाच गोलंदाज आहेत, ही गोष्ट खोडून निघाली आहे, असंही रोहितने सांगितलं आहे.