'तू नसतीस तर मी माधुरीशीच लग्न केलं असतं', 'हा' सुपरस्टार अभिनेता होता माधुरीच्या प्रेमात, एका फोनने उद्ध्वस्त केलं करिअर

अभिनेत्री माधुरी दीक्षितची 90 च्या दशकामध्ये प्रचंड क्रेझ होती. तिच्याशी लग्न करावं अशी अनेक कलाकारांची इच्छा होती. अशीच एक इच्छा बॉलिवूडच्या सुपरस्टारने व्यक्त केली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 13, 2024, 02:00 PM IST
'तू नसतीस तर मी माधुरीशीच लग्न केलं असतं', 'हा' सुपरस्टार अभिनेता होता माधुरीच्या प्रेमात, एका फोनने उद्ध्वस्त केलं करिअर title=

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री गोविंदा आज चित्रपटांपासून दूर जरी असला तरी एक काळ असा होता जेव्हा त्याच्याकडे साइन केलेल्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी देखील वेळ नव्हता. कामासोबतच तो त्याच्या गोविंदा त्याच्या अफेअरमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत होता. गोविंदाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. पण वर्षांनंतर अभिनेत्याने एक खुलासा केला आहे. तो एकदा अभिनेत्री माधुरी दीक्षितशी लग्न करणार आहे. 

गोविंदाने आपल्या कारकिर्दीत राजा बाबू, कुली नंबर वन आणि हिरो नंबर वन यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यावेळी अभिनेता आणि करिश्मा कपूरची जोडी खूप हिट मानली जात होती. मात्र, गोविंदाची ती आवडती अभिनेत्री नव्हती. त्याची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित होती. जी लाखो लोकांची क्रश होती. माधुरीसोबत गोविंदाला लग्न करायचे होते. असा खुलासा गोविंदाने केला होता. 

गोविंदाने पत्नीसमोर सांगितले होते क्रशचे नाव

सिद्धार्थ काननचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा त्याची पत्नी सुनितासोबत बसलेला दिसत आहे. त्यावेळी तो सुनीताला म्हणाला की, जर मी तुला पसंत केले नसते तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं. माधुरी दीक्षित माझी आवडती नायिका आहे. ती सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. माधुरीचा कोणतंही पात्र किंवा चित्रपट नाही जो फक्त येतो आणि जातो. ती खूपच छान व्यक्ती आहे. मी अनेकदा सुनीताला म्हणायचो की माधुरीचा स्वभाव खूप चांगला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका फोनने सर्वच बिघडलं

गोविंदाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याने आपल्या सेक्रेटरीला फोन चालू ठेवून डेव्हिड धवनला पाठवला होता. त्यावेळी त्याला दाऊदने सांगितले की गोविंदा खूप प्रश्न विचारू लागला आहे. त्यामुळे मी यापुढे काम करणार नाही. अभिनेत्याने हे ऐकले आणि दोघेही 6 महिने एकमेकांना बोलले नाहीत. यानंतर दाऊद आणि गोविंदा यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.