Jaya Bachchan :लग्नानंतर पत्नीने असंच असायला हवं...बिग बी यांची जया बच्चनसमोर ठेवली अट

Jaya Bachchan and Amitabh Bachchan : तुम्हाला माहिती आहे का, बिग बी यांनी लग्नापूर्वीच जया बच्चन यांना सांगितलं होतं, मला लग्नानंतर अशी बायको मुळीच नको. अमिताभ यांनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासमोर लग्नापूर्वी अट घातली होती, हे गुपित खुद्द जया बच्चन यांनी सांगितलं आहे.  

Updated: Oct 30, 2022, 02:48 PM IST
Jaya Bachchan :लग्नानंतर पत्नीने असंच असायला हवं...बिग बी यांची जया बच्चनसमोर ठेवली अट title=
Amitabh Bachchan made a condition before marriage to Jaya Bachchan nmp

Amitabh Bachchan Condition Before Marrying : प्रत्येक जण आपल्या भावी जोडीदार कसा असावा याबद्दल कल्पना करतात. अगदी बॉलिवूडमधील चित्रपटातील अभिनेत्री-अभिनेत्यांमधील प्रेम पाहून आपला जोडीदार असा असावा असे अनेकांना वाटतं. बागवानमधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) याच्यामधील नातं आपलं पण असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, बिग बी यांनी लग्नापूर्वीच जया बच्चन यांना सांगितलं होतं, मला लग्नानंतर अशी बायको मुळीच नको. अमिताभ यांनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासमोर लग्नापूर्वी अट घातली होती, हे गुपित खुद्द जया बच्चन यांनी सांगितलं आहे. (Amitabh Bachchan made a condition before marriage to Jaya Bachchan nmp)

लग्नानंतर पत्नीने असंच असायला हवं... 

बॉलीवूडमधील आयकॉनिक जोडपं म्हणून अमिताभ आणि जया बच्चनकडे पाहिलं जातं. त्यांची प्रेम कहाणी असो किंवा त्यांच्यामधील केमिस्ट्री हे सगळं सर्वसामान्यांना भुरळ घालतात. जया बच्चन यांनी सांगितलं की, मिस्टर बच्चन यांना कधीही 9 ते 5 वेळे वाली बायको नको होती. जया बच्चन यांनी लग्नानंतर काम सुरु ठेवावं आणि स्वत:ची ओळख निर्माण करावी. बच्चन या नावाने नाही तर जया आपल्या नावाने ओळखली जावी अशी, अट बिग बी यांनी लग्नापूर्वी घातली होती.

3 जून 1973 रोजी लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. हे जोडपे पुढील वर्षी त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. नव्या नवेली नंदा (navya naveli nanda) यांच्या 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya) या पॉडकास्टवर जया बच्चन यांनी अटची खुलासा केला. दरम्यान जया बच्चन रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्यासह दिसणार आहे. खास करुन या चित्रपटात धर्मेंद्रसोबत (Dharmendra) जया बच्चन पुन्हा दिसणार आहेत. तर सूरज बडजात्याच्या उंचाईमध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.