खरंच कार्तिक आर्यनचं लग्न झालंय? खुद्द अभिनेत्याने सांगितलं सत्य

नक्की काय आहे सत्य...  

Updated: Jan 16, 2022, 10:25 AM IST
खरंच कार्तिक आर्यनचं लग्न झालंय? खुद्द अभिनेत्याने सांगितलं सत्य title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता म्हटलं तर चर्चा तर होणारचं. अनेक तरूणींच्या मनातील ताईद असलेला अभिनेता कार्तिक आर्यनबद्दल चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. आता देखील कार्तिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसंच आहे.  सध्या कार्तिकच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे. एकदा कार्तिकचं लग्न झालं असल्याची बातमी समोर आली.

आता खुद्द कार्तिकने याबद्दल खुलासा केला आहे. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला, “मी एका फॅनसोबत लग्न केल्याचं एका पोर्टलवर पाहिलं. खरं तर असं झालं की मी एका प्रमोशनल इव्हेंटला गेलो होतो. तेव्हाची ही गोष्ट आहे.'

पुढे कार्तिक म्हणाला, 'तेव्हा एक चाहती माझ्या जवळ आली आणि तिने लग्नाची मागणी घातली. हे कोणी ऐकले आणि बातमी छापली की मी माझ्या फॅनसोबत लग्न केलं आहे. बातमी वाचून मला हसू आवरले नाही. मी खूप हसलो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

म्हणजे कार्तिक अद्याप सिंगल आहे. असं खुद्द कार्तिकनेचं सांगितलं आहे.  कार्तिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो नुकताचं 'धमाका' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने कार्तिकला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने मुख्य भूमिका साकारली होती.