मनोरंजनाचा फुल टू धमाल! 'No Entry'च्या सिक्वेलमध्ये 7 अभिनेत्रींसोबत असणार 3 सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. काही सुपरहिट चित्रपटाचे सिक्वेल सुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता सलमान खानच्या No Entry चा देखील सिक्वेल येत आहे. या चित्रपटात 7अभिनेत्रींसह 3 सुपरस्टार असणार आहेत. जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 8, 2024, 01:04 PM IST
मनोरंजनाचा फुल टू धमाल! 'No Entry'च्या सिक्वेलमध्ये 7 अभिनेत्रींसोबत असणार 3 सुपरस्टार title=

No Entry 2 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2005 मधील सलमान खानचा एक चित्रपट खूपच हिट झाला होता. तो म्हणजे 'नो एन्ट्री'. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सलमान खानसह अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन इराणी यांनी काम केलं आहे. आता 19 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल तयार होणार आहे. पण यावेळी या चित्रपटात सलमान खान आणि अनिल कपूर हे नसणार आहेत. हा चित्रपट पूर्णपणे नवीन कलाकारांना घेऊन बनवला जाणार आहे. 

'नो एन्ट्री 2' या चित्रपटाच्या सिक्वेलवर अनीस बज्मी आणि बोनी कपूर एकत्र काम करत आहेत. या दोघांनी वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जून कपूरसोबत 'नो एन्ट्री 2' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कलाकार घेतल्यामुळे चित्रपटामधील हा सर्वात मोठा बदल असणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

'नो एन्ट्री 2'च्या सिक्वेलमध्ये मोठे बदल

अनीस बज्मी आणि बोनी कपूर याच महिन्यात चित्रपटाच्या कास्टिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटात वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट खूपच खास ठरणार आहे. या चित्रपटात 7 अभिनेत्री दिसणार असल्याचे देखील बोलले जात आहे. चाहते देखील अनीस यांच्या 'नो एन्ट्री 2' ची खूप अतुरतेने वाट पाहत आहेत. 

गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी तयार केलेल्या सर्वात मजेदार स्क्रिप्टपैकी ही एक असल्याचं म्हटले जात आहे. हा चित्रपट खूप कॉमेडी असणार आहे. 'नो एन्ट्री 2' च्या स्क्रिप्टमध्ये 7 प्रमुख भूमिका असणार आहेत. ज्यामध्ये वरुण धवन, अर्जून कपूर आणि दिलजीत दोसांझ हे तिघेही दुहेरी भूमिकेत असणार आहेत. यात 3 अभिनेत्री असणार आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही अभिनेत्रीचे नाव समोर आलेले नाही. 

अनीस बज्मी यांनी सुरुवातीपासूनच नवीन कलाकार घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरु आहे. मात्र, सध्या वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत यांचं त्यांच्या इतर प्रोजेक्टवर काम करत आहेत.