'ती माझी मुलगी आहे...' आराध्या सतत सोबत असण्याच्या प्रश्नावर ऐश्वर्याचं सडेतोड उत्तर, पाहा VIDEO

ऐश्वर्या राय बच्चन सध्या लाइमलाईटमध्ये असून चर्चेचा विषय ठरली आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एक तर तिचं सौंदर्य, फॅशन आणि दुसरं म्हणजे मुलगी आराध्याचं सतत तिच्यासोबत असणं. रिपोर्टरने विचारलेल्या याच प्रश्नाचं ऐश्वर्याने काय दिलं उत्तर? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 28, 2024, 11:35 AM IST
'ती माझी मुलगी आहे...' आराध्या सतत सोबत असण्याच्या प्रश्नावर ऐश्वर्याचं सडेतोड उत्तर, पाहा VIDEO title=

ऐश्वर्या राय जिथे पण जाते तिथे तिच्यासोबत कायम आराध्या तिची मुलगी असते. मग कोणताची अवॉर्ड फंक्शन असो किंवा व्हॅकेशन, प्रत्येक ठिकाणी आई-मुलगी म्हणजे ऐश्वर्या आणि आराध्या एकत्रच दिसतात. तेव्हा कायमच प्रश्न विचारला जातो की, आराध्या शाळेच जात नाही का? सतत फिरण्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर होत नाही का? 

आता आराध्या अबू धाबीमध्ये अवॉर्ड फंक्शनला ऐश्वर्या रायसोबत दिसली. यावेळी पत्रकाराने ऐश्वर्याला आराध्याबद्दल प्रश्न विचारताच तिने एका वाक्यात उत्तर दिलं. या उत्तराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तर झालं असं की, IFFA अवॉर्डसाठी ऐश्वर्या आणि आराध्या अबू धाबीमध्ये 'पोन्नियिन सेलवन' या सिनेमाकरता सर्वोत्त अभिनेत्री (तमिळ) चा पुरस्कार मिळाला. यावेळी सोबत आराध्या देखील होती. यावेळी देखील आराध्याने आपल्या आईला पुरस्कार मिळाला म्हणून आनंद व्यक्त केला आणि चिअर अप करताना दिसली. 

रिपोर्टरच्या बोलण्याचं ऐश्वर्याने असं दिलं उत्तर 

पण याचवेळी ऐश्वर्या मीडियासोबत संवाद साधत होती. तेव्हा एका रिपोर्टरचं बोलणं ऐश्वर्याला आवडलं नाही. रिपोर्टरने विचारं की, 'ऐश्वर्या कायमच तुझ्यासोबत असते. ती खरंच सगळ्या चांगल्या गोष्टी शिकत आहे. '

ऐश्वर्या म्हणाली... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

यावर क्षणाचाही विलंब न करता ऐश्वर्याने त्या रिपोर्टला उत्तर दिलं की, 'ती माझी मुलगी आहे. ती कायमच माझ्यासोबत राहते.' हे ऐकताच सगळीकडे शिट्या आणि टाळ्या वाजू लागल्या. ऐश्वर्याने दिलेलं हे उत्तर व्हायरल होत आहे. 

या शाळेत शिकते आराध्या 

आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकत आहे. पण शाळेपेक्षा ती ऐश्वर्यासोबत विदेश टूर करतानाच दिसते. एका मुलाखतीत ऐश्वर्याने आराध्या शाळा आणि या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते याबद्दल सांगितलं होतं. ऐश्वर्याने सांगितले होते की, ती तिच्या प्रवासाच प्लानिंग अशा प्रकारे करते, जेणेकरून आराध्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये आणि ती शाळेत जाऊ शकेल. ती तिचा वेळ उत्तम प्रकारे मॅनेज करते आणि त्यानुसार तिच्या फ्लाइटची प्लानिंग देखील करते.