धक्कादायक : आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडचं 'हे' कपल घेणार घटस्फोट

प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय घेतला  

Updated: Oct 25, 2022, 03:19 PM IST
धक्कादायक : आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडचं 'हे' कपल घेणार घटस्फोट title=

Charu Asopa Accused Rajeev Sen : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि मॉडेल राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनातील चढ-उतार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. यावेळी अभिनेत्रीने राजीव सेनवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे. चारू असोपाने एका मुलाखतीत सांगितलं की, आता तिने राजीव सेनपासून घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर यावेळी, ती या प्रकरणातून मागे हटणार नाही. चारू असोपा पुढे म्हणाली की, राजीव सेनसोबतचं लग्न वाचवण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या पतीची पोल उघडली आणि तिने चारूलाही ब्लॉक केल्याचं सांगितलं.

याबद्दल बोलताना चारू असोपा म्हणाली, " कोणीही लग्न संपवण्याच्या उद्देशाने फेऱ्या घेत नाही. मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप नको होता. म्हणून मी माझं लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कारण ते माझं दुसरं लग्न होतं. या सगळ्याची माझीच खिल्ली उडवली जात होती. पण मी विचार करायचे की, काय माहिती लग्न चालेल. हे करता-करता आता हा एक तमाशा झाला आहे. मला वाटतं आपण एकमेकांसाठी बनलेले नाही आहोत. हे लग्न आता कधीच चालणार नाही."

राजीव सेन चारू असोपाला सोडून एकटा जायचा 
चारू असोपाने सांगितलं की, राजीव सेनची सर्वात मोठी समस्या ही होती की, तो प्रत्येक भांडणानंतर तिला एकटं सोडायचा आणि ब्लॉक करायचा. याबाबत बोलताना चारू असोपा म्हणाली, "लग्न झाल्यापासून आमच्यात भांडण होत आहेत. प्रत्येक भांडणानंतर राजीव मला सोडून जायचा. आणि मला ब्लॉक करायचा, जेणेकरून मी त्याच्याशी संपर्क करू शकणार नाही.  लॉकडाऊनच्या काही दिवस आधीही त्याने मला तीन महिने एकटं सोडलं होतं. मला समजलं की तो 45 वर्षांचा आहे आणि मी त्याला बदलू शकत नाही. पण मी माझी मुलगी जियाना हिच्यासाठी प्रयत्न करत होते."

राजीव सेनने चारू असोपावर हात उचलला 
टीव्ही अभिनेत्री चारू असोपाने सांगितलं की, राजीव सेनने तिच्यावर अनेकदा हात उचलला आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "राजीवचा राग विचित्र आहे. त्याने मला अनेकवेळा शिवीगाळ केली आणि एक-दोन वेळा हातही उचलला. मी फसवणूक करत असल्याचा त्याला संशय होता. 'अकबर का बाल बिरबल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो  माझ्या सहकलाकारांना माझ्यापासून दूर राहण्यास सांगायचा.