Corona महामारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत!

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संसर्गाचा कालावधी स्वतःच 3 ते 5 दिवसांचा असतो. म्हणूनच लोक खूप लवकर बरे होत आहेत. 

Updated: Aug 28, 2022, 06:18 AM IST
Corona महामारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत! title=

दिल्ली : दिल्लीमध्ये आता कोरोनाची महामारी अंतिम टप्प्यात येताना दिसतेय. या महिन्यात दिल्लीमध्ये कोरोनाचा एक पीक पहायला मिळाला. संसर्गाचे प्रमाण, नवीन रूग्णांची संख्या आणि रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलं होतं. मात्र ते जितक्या वेगाने वाढलं तितक्याच वेगाने ते खाली घटलं. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संसर्गाचा कालावधी स्वतःच 3 ते 5 दिवसांचा असतो. म्हणूनच लोक खूप लवकर बरे होत आहेत. व्हायरसच्या प्रकारांमधील फरक देखील कमी होत आहेत, त्यामुळे संसर्ग देखील स्थानिक पातळीवर मर्यादित केला जात आहे, जो महामारीचा अंत दर्शवतो.

ऑगस्ट महिन्यात अचानक वाढ

ऑगस्टमध्ये दिल्लीमध्ये कोरोनाच्या प्रकरणात अचानक वाढ झालेली दिसली. यावेळी संसर्ग दर कमाल 20 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि नवीन रुग्णांची संख्या दररोज दोन हजारांच्या वर पोहोचली. 9 ऑगस्ट रोजी एका दिवसात 2495 नवीन रुग्णांची नोंद झाली. 11 ऑगस्ट 2276, 12 ऑगस्ट 2136 आणि 2031 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, 11 ऑगस्ट रोजी संसर्ग दर 17.83 टक्के आढळून आला, तर 16 ऑगस्ट रोजी तो 19.20 टक्क्यांवर गेला. पण हळूहळू ते कमी होऊ लागली.

महामारी बनतेय आता साधा आजार

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आता जवळपास महामारी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आता हा एक सामान्य आजाराप्रमाणे भासतोय. त्यामुळे असे छोटे चढ उतार होतच राहतील. प्रथम, व्हायरसच्या प्रकारात काही प्रकारचे बदल झाले आहेत, व्यक्तीची प्रतिकारशक्ती, वर्तणूक आणि वातावरणाचे प्रकार व्हायरस पसरण्यास मदत करतात.

हा व्हायरस आता देशभरात इंडेमिक पातळीवर जातोय. जर आपण चाचणी घेणं थांबवले तर हा आकडा आणखी खाली येईल, कारण सर्दी होईपर्यंत थंडीचा परिणाम होतो आणि लोक 2 ते 3 दिवसात बरे होतात. त्याच्या प्रसाराचे दुसरे कारण म्हणजे मानवी प्रतिकारशक्ती, असंही तज्ज्ञांचं मत आहे.

मात्र तरीही आजारी व्यक्तींनी आणि वयस्कर व्यक्तींनी त्यांची काळजी घेतली पाहिजे.