रेल्वेतून सामान चोरीला गेल्यास जबाबदारी रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

 आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला

Updated: Feb 13, 2021, 10:21 AM IST
रेल्वेतून सामान चोरीला गेल्यास जबाबदारी रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी ही रेल्वेचीच असणार आहे. यासंदर्भातील दाखल झालेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय.  

रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे महिला प्रवाशाला रेल्वेकडून 1 लाख 33 हजारांची मिळाली नुकसान भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश ठेवला कायम ठेवून रल्वेला ही भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आलेयत.न्या. डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

दिल्ली ते सिकंदराबाद प्रवासात एका महिलेच्या चीजवस्तू चोरीला गेल्या. तक्रारदार महिलेला रेल्वे प्रवासादरम्यान सीटखाली सामान बांधून ठेवायचे होते. पण साखळी उपलब्ध नव्हती. तसेच तिकीट नसणारे अनेक प्रवासी डब्यातून प्रवास करत होते. ऑन ड्युटी असलेले रेल्वे पोलीस फुकट्या प्रवाशांना रोखताना दिसत नव्हते. त्यामुळे चोरी झाली, असा दावा या महिलेने केला आणि तो सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरण्यात आला.

भारतीय रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या एका आदेशाविरोधात रेल्वेने ही याचिका दाखल केली होती. 

प्रवाशाच्या चोरीला गेलेल्या सामानाची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने रेल्वेला दिले होते. आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे

त्याबद्दल एक लाख 33 हजार रुपयांची भरपाई रेल्वेने महिलेला देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले होते.