Cyrus Mistry यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन का हटवले होते? वाचा

 टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले आहे. 

Updated: Sep 5, 2022, 01:43 PM IST
Cyrus Mistry यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन का हटवले होते? वाचा title=

Ratan Tata Vs Cyrus Mistry: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या या निधनानं उद्योग क्षेत्रात शोक व्यक्त केला जातो आहे. 

सायरस मिस्त्री यांच्या निधनानं पुन्हा एकदा रतन टाटा आणि त्यांच्या वादावरील चर्चांना उधाण येऊ लागेल आहे. मागच्या वर्षी रतन टाटा यांनी खुद्द त्यांच्या ट्विटरवरून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. पण नेमका त्यांच्यातला वाद काय होता? रतन टाटा यांनी चेअरमनपदावरून सायरस मिस्त्रींना का काढून टाकले होते? 

टाटा सन्समध्ये सर्वाधिक 18 टक्के हिस्सेदारी असलेले शापूरजी पालोनजी यांचा 43 वर्षीय मुलगा सायरस मिस्त्री यांचीटाटा यांनी चेअरमन म्हणून निवड केली होती.

पण हा निर्णय टाटांच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरला जे सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाने स्पष्ट केले होते. सायरस मिस्त्री हे टाटा सन्स कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते ज्यांना टाटा यांनी $100 अब्ज टाटा समूहाचे मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. 

वाद काय होता? रतन टाटा यांनी सायरस यांना चेअरमनपदावरून का काढले? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहाला निवडणुकीसाठी देणगी कशी द्यायची, कोणत्या प्रकल्पात आणि कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक कशी करायची, टाटा समूहाने अमेरिकन फास्ट फूड चेनमध्ये सामील व्हावे की नाही अशा मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या गोष्टींवरून वाद वाढत गेला आणि परिस्थिती इतकी बिघडली की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. 

 

रतन टाटा यांचे ट्विट प्रसिद्ध झाले होते - 
26 मार्च 2021 रोजी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर रतन टाटा यांनी ट्विट केले होते की, ''माझ्या ग्रुपच्या सचोटी आणि नैतिकतेवर सातत्याने हल्ले झाले. टाटा सन्स नेहमीच आपल्या तत्त्वांवर आणि मूल्यांवर ठाम असल्याचे या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे. ट्विटमध्ये रतन टाटा यांनी असेही लिहिले की, यातून आमच्या न्यायव्यवस्थेची निष्पक्षता आणि पारदर्शकता दिसून येते.''

सायरस मेस्त्री आणि रतन टाटा यांच्या प्रकरणाचा घटनाक्रम - 

  • डिसेंबर 2012 : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सची चेअरमन म्हणून निवड. 
  • ऑक्टोबर 2016: सायरस यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात आलं. 
  • जानेवारी 12, 2017: सायरस यांनी चेअरमनपदावरून हटवलं. 
  • फेब्रुवारी 2017: टाटा सन्सच्या संचालक मंडळातून मिस्त्री यांच्या हकालपट्टीच्या बाजूने भागधारकांनी असाधारण सर्वसाधारण सभेत मत दिले. मिस्त्री, त्यानंतर, टाटा सन्समध्ये दडपशाही आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप करत कंपनी कायदा, 2013 च्या विविध कलमांखाली खटला दाखल करतात. 
  • जूलै 2018: सायरस यांची याचिका फेटाळण्यात आली
  • डिसेंबर 2019: NCLAT जेजमेंटनुसार टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवणे बेकायदेशीर
  • जानेवारी 2020: टाटा सन्स आणि रतन टाटा यांनी सुप्रिम कोर्टापुढे NCLAT च्या निर्णयाला आव्हान दिलं. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांना टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी बहाल करण्याच्या NCLAT निर्णयाला स्थगिती दिली.
  • फेब्रुवारी 2020: मिस्त्री यांनी सुप्रीम कोर्टाच्या या स्थगितवर क्रॉस अपील केले. 
  • सप्टेंबर 2020: सुप्रीम कोर्टाने मिस्त्री यांच्या शापूरजी पालोनजी ग्रुपला टाटा सन्समधील शेअर्स गहाण ठेवण्यापासून रोखले आहे.
  • डिसेंबर 2020: सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू झाली.
  • मार्च 26, 2021: न्यायालयाने 26 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देताना सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय कायम ठेवला.