पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर

  यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो.  वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.

प्रशांत जाधव | Updated: Mar 14, 2018, 09:40 PM IST
 पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर  title=

नवी दिल्ली  :  यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो.  वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.

भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताचा विकास दर ८ टक्क्यांवर नेण्यासाठी काही गोष्टींमध्ये सुधार करण्याची गरज आहे. त्यात क्रेडीट, गुंतवणूक आणि निर्यात क्षेत्रातील प्रतिस्पर्धा वाढविण्याची गरज आहे. विकास दर वाढविण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अनुकूल वातावरण बनणे गरजेचे असणार आहे.