'बालाकोट एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान LoC पार करु शकला नाही'

 पाकिस्तानने केलेले दावे वायुसेना प्रमुखांनी फेटाळले आहेत. 

Updated: Jun 24, 2019, 12:36 PM IST
'बालाकोट एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तान LoC पार करु शकला नाही' title=

नवी दिल्ली : पुलवामा नंतर भारताच्या बालाकोट एअर स्ट्राईकवर भारतीय वायुसेनेचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पहील्यांदाच माध्यमांसमोर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानने केलेले दावे फेटाळले आहेत. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान आमच्या हवाई हद्दीत घुसलाच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

आमचा उद्देश हा त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ला करणे हा होता. पण त्यांचा हेतू हा आमच्या सैन्याला निशाणा बनवण्याचा होता. आम्ही आमच्या सैन्याचा हेतू यशस्वी केला. त्यांच्यातर्फे कोणीही नियंत्रण रेषा ओलांडून पुढे आला नसल्याचे बीरेंद्र सिंह धनोआ यांनी स्पष्ट केले.