PM Kisan:कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा! e-KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख वाढवली

PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 

Updated: Mar 25, 2022, 12:49 PM IST
PM Kisan:कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा!  e-KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख वाढवली title=

मुंबई : PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता या शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी 31 मे पर्यंत वेळ देण्यात आला आहे, तर पूर्वी eKYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. जे वेळेवर eKYC करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा दोन हजार रुपयांचा शेवटचा हप्ता थांबू शकतो.

कृषी विभागाच्या माहितीनुसार आता ई-केवायसी 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल. त्यामुळे तुमचा हफ्ता थांबू द्यायचा नसेल तर तत्काळ e-KYC करता येईल.

ई-केवायसी कसे पूर्ण करायची?

STEP 1: इंटरनेटवर pmkisan.gov.in टाइप करा. आता तुम्ही  पीएम किसान पोर्टलच्या होमपेजवर पोहोचाल. तिथे तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर टॅप करा.

पायरी 2: त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. बॉक्समध्ये टाइप करा.

STEP 3: यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करावे लागेल. त्यानंतर OTP पुन्हा येईल जो 6 अंकांचा असेल. ते भरा आणि सबमिट बटणावर टॅप करा.

पीएम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये देते, जे 2000-2000 च्या 3 हप्त्यांमध्ये दिले जाते. या वर्षाचा पुढील हप्ता 1 एप्रिल नंतर येणार आहे.