'मन की बात'मधून पंतप्रधानांची सावरकरांना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 32व्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.

Updated: May 28, 2017, 12:18 PM IST
'मन की बात'मधून पंतप्रधानांची सावरकरांना आदरांजली  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 32व्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा देत त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसंच स्वातंत्रवीर सावरकरांना आदरांजली अर्पण केली.

सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानं जनतेला उत्तर देणं हे सरकारचं काम असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. शिवाय वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करणा-या रहिवासी संघटनेचंही मोदींनी कौतूक केलं.