RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?

देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 18, 2023, 09:58 AM IST
RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?
RBI Imposes Penalty on ICICI Bank latest bank news

RBI Imposes Penalty: देशातील महागाई, बँकांकडून दिलं जाणारं कर्ज, कर्जावरील व्याज, विविध आर्थिक धोरणं या आणि अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असणाऱ्या आयरबीआय (RBI) अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आता कठोर पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. या बँकेकडून सातत्यानं काही नियमांची आखणी करत त्यांचं पालन न करणाऱ्या बँकांना धडा शिकवण्याचं काम आरबीआय हाती घेताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं एसबीआयला दणका दिला होता. ज्यानंतर आता खासगी क्षेत्रातील आणि अनेक पगारदारांची खाती असणाऱ्या दोन बँकांना आरबीआयनं शिक्षा ठोठावली आहे. उपलब्ध माहितीनुसार रिझर्व्ह बँकेनं आयसीआयसीआय बँकेला  (ICICI Bank) 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांची पेनल्टी सुनावली आहे. 

हेसुद्धा वाचा : सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम

आयसीआयसीआय बँकेवर लोन आणि अॅडवान्सशी संबंधित नियम आणि फ्रॉड क्‍लासीफ‍िकेशन आणि इतर बँकांकडून माहिती देण्यासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. तर, वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील त्रुटी आणि नियमांचं पालन कन करण्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही बँकांकडून नियमांचं पालन करण्यामध्ये अनेक अडचणी दिसून आल्या कारणानं आरबीआयनं कारवाईचा निर्णय घेतला. 

आरबीआयच्या कारवाईचा खातेधारकांवर परिणाम 

केंद्रीय बँकेकडून मागील महिन्यामध्ये साधारण 20 सहकारी, खासही आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधित दंडाची रक्कम आयसीआयसीआय बँकेला ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, बँकेच्या या कारवाईचा खातेधारकांवर थेट परिणाम होणार नसून त्यांच्यासाठी बँकिंग सुविधा सुरळीत सुरु राहतील हे स्पष्ट करण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं घेतलेला मोठा निर्णय 

RBI नं बँकांवर कारवाई करण्यासोबतच एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. जिथं 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीशी संबंधित एक नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या नियमानुसार तुम्ही प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं असल्यास ते पूर्ण फेडण्यासाठी 30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्र ग्राहकांना परत द्यावी लागणार आहेत. बँकांकडून ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास दर दिवशी त्यांना 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.   

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More