४८ तासांत सात वाघांनी गमावला जीव

गेल्या ४८ तासांत देशानं सात वाघ गमावल्याचं समोर येतंय. 

Updated: Feb 27, 2018, 08:51 PM IST
४८ तासांत सात वाघांनी गमावला जीव  title=

नागपूर : गेल्या ४८ तासांत देशानं सात वाघ गमावल्याचं समोर येतंय. 

विदर्भात झालेल्या विविध घटनांमध्ये सात वाघांनी आपले प्राण गमावलेत. त्यापैंकी काही वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं पुढे आलंय.

रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एका जखमी वाघाचा उपचाराविनाच मृत्यू झाला. सोमवारी नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी भागातील जंगलात हा बछडा वाघिणीपासून दूर झाल्याने एकटाच आढळला होता.

अशक्त झालेल्या बछड्याला चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या प्राथमिक सुश्रृषा केंद्रात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत त्याचावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला.ॉ
 
दरम्यान, पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोलितमाराजवळ पेंच नदीत २४ फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला होता. गोरेवाड्यात वन्यप्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीने तीचे चार पिल्ले गमावली आहेत.