खाडीत मुलांना सोडून जाणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

लहान मुलांना खाडीत सोडून जाणारी महिला गेली कुठे?

Updated: Dec 22, 2020, 06:42 PM IST
खाडीत मुलांना सोडून जाणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर title=

डोंबिवली : ठाकुर्लीजवळील कचोरे खाडीमध्ये दोन लहान मुलांना सोडून गेलेल्या महिलेचा अद्यापही शोध सुरूच आहे. विशेष म्हणजे 16 दिवसानंतर या मुलांना घेऊन जातानाचा या महिलेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मात्र अद्यापही या महिलेचा कोणताही ठाव ठिकाणा सापडला नसल्याने पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

डोंबिवलीत आपल्या दोन चिमुकल्यांना खाडीत छोट्या टापूवर सोडून गेलेल्या महिलेच्या अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेला 16 दिवस उलटूनही टिळकनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. शक्यता वर्तवली जात आहे की रत्नमाला नावाच्या या महिलेने आपल्या दोन चिमुकल्या सोडून आत्महत्या केली असावी, मात्र अद्याप तिचा मृतदेह किंवा ती सापडलेली नाही.

घटनेपूर्वी रत्नमाला आपल्या दोन लहान मुलांसोबत जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे ही महिला कुठे आहे ? तिच्यासोबत काय घडले आहे? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

संबंधित बातमी : कोणत्याही आईवडिलांनी आपल्या लहान मुलांशी असं वागू नये...