धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबादच राहणार; निवडणुक आयोगाचे आदेश

धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबाद असेच राहणार आहे. निवडणुक आयोगाचे तसे आदेश जारी केले आहेत. 

Updated: Jan 29, 2024, 07:57 PM IST
धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबादच राहणार; निवडणुक आयोगाचे आदेश title=

Osmanabad Dharashiv : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच  निवडणुक आयोगाने खूप मोठा निर्णय जाहीर केला आहे. धारशिव लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांचे नाव उस्मानाबाद असेच राहणार असल्याचे आदेश  निवडणुक आयोगाने जारी केले आहेत. राज्यात उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, नाव बदलूनही मतदार संघाचे नाव बदलणार नसल्यामुळे नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी होणार आहे. 

2026 पुर्वी मतदार संघाचे नाव जैसे थे च राहणार 

उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जरी झाले असले तरी लोकसभा, विधानसभा व विधान परिषद मतदार संघातील नाव हे उस्मानाबाद असेच असणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगासोबत राज्य निवडणुक आयोगाने पत्रव्यवहार केल्यानंतर निवडणुकीत उस्मानाबाद हेच नाव असणार आहे. परिसिमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असुन त्यानंतर मतदार संघ नाव व पुनररचना होणार आहे. त्यामुळे 2026 पुर्वी मतदार संघाचे नाव जैसे थे च राहणार आहे.

15 सप्टेंबर 2023 च्या अद्यादेशानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे व विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे करण्यात आले होते. परिसीमन कायद्याच्या तरतुदीनुसार लोकसभा व विधानसभा मतदार संघांचे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव 28 नोव्हेंबर 23 रोजी भारत निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. भारत निवडणुक आयोगाने 5 जानेवारी 24 रोजीच्या पत्रानुसार राज्यामध्ये प्रशासकीय भाग तयार करणे, त्यामध्ये सुधारणा व नावामध्ये बदल करणे हे राज्य सरकारद्वारा आवश्यकतेनुसार वेळोवेळी करण्यात आलेली नियमित प्रक्रिया असते असे कळविले आहे.

लोकसभा, विधानसभा मतदार संघांचे नाव व्याप्ती त्यावेळी स्थापित करण्यात आलेल्या परीसीमन आयोगाने निश्चित केलेली आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा व विधान परिषद मतदार संघाच्या नावामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे दरम्यान आता उस्मानाबाद हे नाव राहणार असल्याने राजकीय पक्ष प्रशासकीय अधिकारी यांची चांगलीच गोची झाली आहे गेल्या काही दिवसापासून धाराशिव नाव बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत धाराशिव नावांची तयारी प्रशासनाने व राजकीय पुढारी देखील केली होती ते आता बदलून कंसात धाराशिव ठेवावे लागणार आहे.

राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. 27 फेब्रुवारीला यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभा निवडणूक होत असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भाजपच्या तीन खासदारांचा तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एका खासदाराचा कार्यकाळ संपत आहे.