भंडाऱ्यात महाप्रसादातून तब्बल ८० ग्रामस्थांना विषबाधा

महाप्रसादातून तब्बल ८० ग्रामस्थांना विषबाधा

Updated: Jan 6, 2020, 04:36 PM IST
भंडाऱ्यात महाप्रसादातून तब्बल ८० ग्रामस्थांना विषबाधा title=

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील रोहिणी या गावात महाप्रसादातून तब्बल ८० ग्रामस्थांना विषबाधा झाली. भागवत सप्ताह समाप्ती सोहळ्याचा महाप्रसाद खाल्ल्यानंतर सोमवारी सकाळपासून ग्रामस्थांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. 

काहींना ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान, आता स्थिती आटोक्यात आहे.