राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत

Maharashtra Government Pension​ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

Updated: Aug 26, 2022, 07:52 AM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत title=

मुंबई : Maharashtra Government Pension : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सरकारने रक्कम जमाच केली नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेचे पैसे ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’मध्ये हस्तांतरित करणं बंधनकारक होते. मात्र राज्य सरकारनं 10 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम थकवली. ही रक्कम सरकारनं तातडीने हस्तांतरित करावी, अन्यथा सरकारवरील बोजा वाढत जाईल, असा सल्ला नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी राज्य सरकारला दिलाय.

 राज्य सरकारने नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवृत्तिवेतन योजना जाहीर केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी 10 टक्के तर सरकारनं 14 टक्के रक्कम एनएसडीएलमध्ये जमा करणे आवश्यक होते. पण  31 मार्च 2021 अखेर राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाटयाची 10 हजार 642 कोटींची रक्कमच हस्तांतरित केली नाही. हा अहवाल मार्च 2022 मध्ये तयार करण्यात आला. तोपर्यंत 2021 अखेरची रक्कम थकविण्यात आली होती. गेल्या वर्षभरात ही रक्कम वाढली की, भरली त्याची स्पष्टता या अहवालात नाही.