'ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्याचा मी बदला घेणार' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

'मी पुन्हा आलो, एकटा नाही तर यांना सोबत घेऊन आलो' असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस

Updated: Jul 4, 2022, 12:57 PM IST
'ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्याचा मी बदला घेणार' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. अखेर सत्तासंघर्ष संपुष्टात आला असून सत्तांतर झालं आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीनं विश्वासदर्शक ठराव 164 मतांनी जिंकला आहे. यावेळी विधिमंडळात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना मिश्कील भाष्य करत चिमटे काढले आहेत. 

महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही हे मी सांगितलं होतं.  माझी खूप टिंगल टवाळी झाली असंही फडणवीस म्हणाले. ज्यांनी टिंगल टवाळी केली त्यांना मी माफ केले. माझी खूप टिंगल टवाळी झाली.

सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊ नये, कारण पुन्हा पाच वर्षांनी परीक्षा द्यायची आहे हे लक्षात ठेवावं असं म्हणत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे. 

जनतेने आम्हाला कौल दिला असताना आमचे सरकार हिसकावून नेलं, आमची एवढीच खंत होती. मला माझ्या नेत्यांनी आदेश दिला होता उपमुख्यमत्रीपदी बसवलं. मला जरी घरी बसवले आसते तरी बसलो असतो असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.