भिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग, १५ ते १६ गोदामं जळून खाक

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील आगीच्या घटनांची सत्र अजूनही सुरुच आहे. काल रात्री भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात मोठी आग लागली. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Jan 31, 2018, 01:33 PM IST
भिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग, १५ ते १६ गोदामं जळून खाक title=

भिवंडी : मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील आगीच्या घटनांची सत्र अजूनही सुरुच आहे. काल रात्री भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात मोठी आग लागली. 

गायत्री नगर परिसरातील सरदार कंपाऊंडमधील भंगारच्या गोदमला भीषण आग लागली आहे. या आगीत १५ ते १६ गोदामं जळून खाक झाल्याचे समजते. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ही आग अजूनही दोन ते तीन तास आटोक्यात येणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय.

या गोदामांच्या आजूबाजूला दाट लोक वस्ती असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. घटनास्थळी भिवंडी, कल्याण व उल्हासनगरच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.