महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय; प्रिया दत्त यांच्याकडून पायलटांची पाठराखण

राजस्थानमध्ये सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. 

Updated: Jul 14, 2020, 06:42 PM IST
महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय; प्रिया दत्त यांच्याकडून पायलटांची पाठराखण title=

मुंबई: राजस्थानमध्ये सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून मंगळवारी दुपारी हकालपट्टी झाली. यानंतर प्रिया दत्त यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये प्रिया दत्त यांनी म्हटले आहे की, माझ्या आणखी एका मित्राने पक्ष सोडला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण उमदे नेते होते.

Rajasthan Crisis: काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलटांनी उचलले मोठे पाऊल

आमच्या पक्षाने हे दोन्ही नेते गमावले आहेत. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही, असे मला वाटते. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांनीही कठीण काळात पक्षासाठी मेहनत घेतली आहे, असे प्रिया दत्त यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रिया दत्त यांच्या या एकूण ट्विटचा सूर हा ज्येष्ठांविषयी नाराजी व्यक्त करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रिया दत्त यांनी २०१९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसांघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीपासून मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी माजली आहे. पक्ष संघटनेत परस्परविरोधी गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रिया दत्त लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून दूरच राहिल्या आहेत. 

सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये Rajasthan Crisis सुरु झालेले सत्तानाट्य आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. काहीवेळापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.