मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडीतून विषबाधा झालीय.

Updated: Dec 13, 2017, 09:56 PM IST
मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा title=

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडीतून विषबाधा झालीय.

शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांना शाळेच्या जवळच्या कोकण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तत्काळ मुलांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार सुरु आहेत. 

परंतु, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.