टीम इंडियाचं काय होणार?

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर २ विकेट्स ११४ गमावून रन्सपर्यंत मजल मारली आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही ३५४ रन्सनी पिछाडीवर आहे. गौतम गंभीर ६८ रन्सवर आणि सचिन तेंडुलकर ८ रन्सवर नॉटआऊट आहेत.

Updated: Jan 5, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर २ विकेट्स ११४ गमावून रन्सपर्यंत मजल मारली आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही ३५४ रन्सनी पिछाडीवर आहे. गौतम गंभीर ६८ रन्सवर आणि सचिन तेंडुलकर ८ रन्सवर नॉटआऊट आहेत. सिडनी टेस्टमध्ये इनिंगनं पराभव टाळण्यासाठी भारताला जवळपास दोन दिवस बॅटिंग करावी  लागणार आहे. दरम्यान, टीम इंडियानं १०० रन्सवरच आपल्या दोन विकेट्स गमावल्या होत्या. राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. द्रविड २९ रन्सवर आणि सेहवाग ४ रन्सवर बेन हिलफेनहॉसच्या बॉलिंगवर आऊट झाले.

 

टीम ऑसीने जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश करून टीम इंडियासमोर मॅच वाचवण्याचं आव्हान उभं केल आहे. याच आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली, मात्र त्यानंतर गौतम गंभीरने ‘गंभीर खेळी’ करत आपलं अर्धशतक साजरं केल. ५५ बॉलमध्ये त्यांनी ५१ रन केले तर. द्रविडने एका बाजूने खिंड लढवत होता. भारतासमोर आस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे, भारताला मॅच वाचवण्याचं आव्हान आहे. त्यातच टीम इंडियाची सुरवात ही पुन्हा एकदा खराब झाली आहे. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग फक्त ४ रन्स बनवून तंबूत परतला.

 

सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं आपली पहिली इनिंग ४ आऊट ६५९ रन्सवर घोषित केली आहे. कांगारुंकडे पहिल्या इनिंगमध्ये ४६८ रन्सची भक्कम आघाडी आहे. मायकल क्लार्कनं नॉटआऊट ३२९ रन्सची इनिंग खेळली. माईक हसीनही नॉटआऊट दिडशतकी खेळी केली. आता भारताला सिडनी टेस्ट वाचवण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. भारताला केवळ चार विकेट्सच घेण्यात यश आलं.

 

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कनं शानदार ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही पहिली-वहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. त्याचप्रमाणे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. मायकल क्लार्कने ४३५ ब्लॉसचा सामना करत पहिलं वहिलं त्रिशतक झळकावंल.

 

ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १३ बॅटमन्स बाद झाले, त्याच खेळपट्टीवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त अवघा एकच बॅटमन्स बाद झाला. सिडनी मायकेल क्‍लार्क आणि रिकी पॉंटिंग या आजी-माजी कर्णधार; तसेच माईक हसीच्या जोरदार खेळाने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावरही दुसऱ्याच दिवशी मजबूत पकड मिळविली.  ही पकड तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

 

रिकी पॉंटिंगचे (१३४) शतक आणि त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २८८ रन्सच्या भागीदारीने  टीम इंडियाच्या बॉलर्सच्या उणिवा साफ उघड्या पडल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पॉंटिंग आणि क्‍लार्क या आक्रमक शैलीच्या फलंदाजांनी लौकिकाला साजेसा खेळ करताना ऑस्ट्रेलियन संघाची सामन्यावरील पकड मजबूत केली. दिवसभरातील ९०  षटकांच्या खेळात ३६६ रन्स काढल्या गेल्या आणि  टीम इंडियाच्या  बॉलर्सना केवळ रिकी पॉंटिंगला बाद करण्यात यश आले. अर्थात, तोपर्यंत क्‍लार्क-पॉंटिंग जोडीने  टीम इंडियाचे सामन्यातील अस्तित्वच जणू संपुष्टात आणले होते.

 

पॉंटिंग बाद झाल्यावर खेळायला आलेल्या माईक हसीनेदेखील (नाबाद ५२) अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या बॉलर्सच्या अपयशावर मीठच चोळले. दुसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने ४  बाद ४८२ धावांची मजल मारताना २९१ रन्सची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाच्या या आघाडीने दुसऱ्याच दिवशी जणू भारताच्या सलग दुसऱ्या पराभवाची नांदी दिली आहे.

 

इंडिया – (दुसरा डाव) 114/2 (41.0)

ऑस्ट्रेलिया - (पहिला डाव घोषित) 659/4 

टीम इंडिया (पहिला डाव) –  191