अक्षय तृतीया बाबतच्या ११ महत्त्वाच्या गोष्टी

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. याच दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. पाहा काय आहे या दिवसाचं महत्त्व.

Updated: May 9, 2016, 11:09 AM IST
अक्षय तृतीया बाबतच्या ११ महत्त्वाच्या गोष्टी title=

मुंबई : अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. याच दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. पाहा काय आहे या दिवसाचं महत्त्व.
 
१. आजच्या दिवशी गंगा धरतीवर अवतरली होती.

२. आजच्या दिवशी महर्षी परशुराम यांचा जन्म झाला होता.

३. अन्नपूर्णा देवीचा जन्म आज झाला होता.

४. श्रीकृष्णांनी आजच्या दिवशी द्रवपदीला वस्त्रहरण होण्यापासून वाचवलं होतं.

५. आजच्या दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झाली होती.

६. कुबेराला आजच्याच दिवशी धन सापडलं होतं.

७. सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात याच दिवसापासून झाली होती.

८. ब्रम्हाचा पुत्र अक्षय कुमारचं अवतरण याच दिवशी झालं होतं.

९. प्रसिद्ध तीर्थस्थळ बद्री नारायणाचं कपाट आजच्याच दिवशी उघडलं जातं. 

१०. वृंदावनाच्या बांके बिहारी लालचं चरण दर्शन फक्त आजच्याच दिवशी होतं.

११. आजच्याच दिवशी महाभारताचं युद्ध समाप्त झालं होतं.