मरणानेही त्याची सुटका केली नाही...

फक्त ५ हजारांसाठी या महिलेने..

Bollywood Life | Updated: Feb 18, 2016, 10:33 PM IST
मरणानेही त्याची सुटका केली नाही... title=

कियोंझार : पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पोटच्या मुलांना गहाण ठेवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओडिशातील कियोंझार जिल्ह्यात ही घटना घडली आहे.  फक्त ५ हजारांसाठी या महिलेने आपल्या पोटच्या मुलांना गहाण ठेवले. 

अनेक दिवस होऊनही ही घटना उघडकीस आली नव्हती. या भागातील स्थानिक गटविकास अधिकारी, नायक हे बुधवारी गावात आल्यानंतर त्यांना याबद्दल माहिती मिळाली.

गधुली गावात राहणाऱ्या आदिवासी समाजातील सावित्री नायक या महिलेचा पती राईबा, हे काही दिवसांपासून आजारी होते. अखेर २६ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सावित्रीकडे पैसे नव्हते. तिने अनेकजणांकडे मदत मागून पाहिली. 

मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर सावित्रीने नाईलाजाने तिचा १३ वर्षांचा मुलगा मुकेश आणि ११ वर्षांच्या सुकेशला ५ हजारासाठी गहाण ठेवले, यानंतर या पैशातून पतीवर अंत्यसंस्कार केले.