खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Updated: Jan 21, 2015, 12:00 PM IST
खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ! title=

नवी दिल्ली : देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे दर तीन वर्षांनी वाघांची गणना केली जाते. यातल्या आकड्यांनुसार, २०११ मध्ये १ हजार ७०६ वर असलेली वाघांची संख्या यंदा थेट २ हजार २२६ वर पोहोचलीय. विशेष म्हणजे जगभरात वाघांच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना भारतात मात्र त्यात लक्षणीय वाढ झालीय.

वर्ष २०१० मध्ये वाघांची एकूण संख्या १ हजार ७०६ असल्याचं आढळून आलं होतं. २००६ मध्ये वाघांची संख्या तर चिंतेचा विषय बनली होती. यावेळी, त्यांची संख्या १ हजार ४११ इतकी आढळली होती. पण, त्यानंतर मात्र घटत जाणाऱ्या वाघांच्या संख्येचा विषयावर जनजागृती करण्यात आली. 

२०१४ मध्ये वाघांच्या संख्येचा रिपोर्ट जाहीर करताना पर्यावरण  मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'सफलतेची गाथा' असा याचा उल्लेख केलाय. जगभरात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना भारतात मात्र ही संख्या वाढतेय. 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशातील १८ राज्यांत एकूण ३,७८,११८ किलोमीटर वनक्षेत्रातील वाघांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये वाघांची एकूण १,५४० दुर्मिळ फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या राज्यांत वाघांची संख्या लक्षणीय वाढलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.