बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.

Updated: Mar 13, 2016, 03:57 PM IST
बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी title=

मुंबई: बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या. पण आता बॉलीवूडमधल्या खऱ्याखुऱ्या आणि वादग्रस्त नात्यांवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न होत आहे. 

अँड टीव्हीवर मेरी आवाजही पेहचान है ही नवी सिरियल सुरु होत आहे. ही सीरियल म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींमधील नात्यांची कहाणी आहे, असं बोललं जात आहे.

दोन गायक बहिणींची ही कहाणी आहे. या मालिकेच्या मुख्य भूमिकेमध्ये दीप्ती नवल आहेत, ज्यांचा मेकअप हुबेहुब लता मंगेशकरांसारखा करण्यात आला आहे. तर त्यांचा तरुण वयातील रोल अमृता राव करणार आहे. 

जरीना वहाब यांचा लूक आशा भोसलेंशी मिळता जुळता आहे, तर अदिती गुप्ता यांनी त्यांची तरुण वयातील भूमिका केली आहे.