औरंगाबादमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

औरंगाबादच्या मिटमिटा तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये. 

Updated: Nov 6, 2016, 11:36 AM IST
औरंगाबादमध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या मिटमिटा तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये. 

आशुतोष म्हस्के, प्रतिक ओमने आणि अनिकेत ढवळे अशी या तिघांची नावं आहेत. बुडालेल्या तिघांपैकी अनिकेत ढावळे आणि अनिकेत मस्के या दोघांचे मृतदेह सापडले असून तिस-याचा मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. 

हे तिघेही पीईएस कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. दोन तरुण नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, तर एक जण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता.